
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत धुवांधार पाऊस पडणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी मध्ये आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही तासात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
India Meteorological Department | Maharashtra Rain
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील बहूतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके जळून सुध्दा गेली. तसेच भविष्यात बहूतांश जिल्ह्यात भंयकर पाणी टंचाई सुध्दा भासली असती. मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतू बहूतांश भागात अजूनहि पुरेसा पाऊस पडेलला नाही.
भारतीय हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशार दिला आहे. पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यांना मध्ये पुढील तीन ते चार तासात पावसाची सुरुवात होणार तसेच भारतीय हवामान खात्याने या सहा जिल्ह्यांना अर्लट जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात मेघगर्जनासह अति मुसळधार पाऊस होईल. तसेच मानवी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.
अजूनहि महाराष्ट्रातील अनेक गावात पुरेसा पाऊस पडेलेला नाही. परंतू पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
